जगभरात चविष्ट पदार्थात - चव निर्माण करण्यासाठी मिरचीचा सहभाग प्रकर्षाने जातो. मिरचीमुळे भारतातील अनेक छोटे-छोटे गावं सातासमुद्रापलिकडे जोडले गेले आहेत-हे सत्य मिरचीची महती कळायला पुरेसे आहे. फक्त विदेशीच नाही तर देशी बाजारपेठेतही मिरचीची मागणी मोठी आहे. प्रक्रिया उद्योगातही श्रेष्ठतम् मिरचीची भरपुर मागणी आहे. महाराष्ट्रात २ लाख हेक्टर क्षेत्र मिरची लागवडी खाली असून, एकूण क्षेत्रापैकी ७५ टक्के क्षेत्र जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, अमरावती, चंन्द्रपूर व उस्मानाबाद जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रात हिरव्या मिरचीचे उत्पादन २०० ते ५०० क्विंटल प्रती हेक्टरी उत्पादकता शेजारील राज्याच्या सरासरी उत्पादकतेच्या २५ % मात्र आहे. सदर तंत्राचा अंतर्भाव केल्यास उत्पादकतेत कमालीची सुधारणा शक्य आहे. पुर्व तयारीसाठी कंपोस्टर, मिश्र-जैविक खत, व मिश्र-सुक्ष्मअन्नद्रव्याचा उपयोग : मिरचीसाठी काळी आणि पाण्याचा लगेच निचरा होणारी जमीन हवी. थोडा वेळ साठणारे पाणी उत्पादकडतेत मोठी घट निर्माण करू शकते कारण मिरची बुरशीजन्य रोगाला लवकर बळी पडते. हे टाळण्यासाठी उच्च दर्जाचे...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा