शेतकरी, उद्योजक व कंत्राटदार यांना "मजुरांची" समस्या फार मोठी असते. एकतर मजूर मिळत नाहीत, मिळाले तर त्यांच्याजवळ योग्यता नसते, अपेक्षा मोठी असते, अनेक लोकं अंगकाढू असतात, शेतात चोऱ्या करतात, ऐन वेळी काम सोडून निघून जातात वगैरे. सर्वच प्रश्नांना एकाच लेखात समाधान शोधता येणार नाही. इतकेच काय जर तुम्ही या ब्लॉग च्या खाली आपले मतव्यक्त केले, सूचना मांडल्या तर कालांतराने या लेखात सुधारणा करता येतील. गरज हि शोधाची जननी असते. पोटाचा खड्डा भरणे हि मजुराची खरी गरज असते व म्हणूनच तो कामाचा शोध घेतो. मधल्या काळात सरकारने गरिबी रेषे खालील लोकांसाठी २ रु किलो तांदूळ, गहू असे प्रकार केल्याने "पोटाचा खड्डा भरणे" हि गरज संपली व मजुर मिळण्यास मोठी समस्या निर्माण झाली. अर्थात तरीही अनेक ठिकाणी मजूर उपलब्ध आहे कारण प्रत्येकाला फक्त पोटाचा खड्डा भरायचा नसतो. अन्नाच्या पलीकडे चांगले वस्त्र, चांगला निवारा, मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य सुविधा, मुला-बाळांची लग्ने, मनोरंजन, पुरेशी व चांगली झोप, सुसंस्कृत मूल्यवर्धित जीवन, म्हतारपणासाठी जमा-पुंजी या देखील गरजा प्रत्येकाला असतात. शेतक...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा