फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

आपण पुढच्या पिढीला ७/१२ तर देऊ पण शेती देऊ शकणार नाही.

निव्वळ खर्चिक योजना आखून उत्पादन वाढणे शक्य नाही, मातीचे परीक्षण करणे वा त्यानुसार समतोल साधायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आम्ल-विम्ल व क्षारयुक्त जमिनीचा जन्म वर्षानुवर्षा केल्या गेलेल्या अव्याहत कृषि पाध्दतीचा परिणाम आहे. पुन्हा-पुन्हा चुकांचा तक्ता गिरवुन आजची शेती अशाश्वत झाली आहे. मृदेच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांची अपरिमित हानी झाली आहे. जर हे असेच सुरू राहीले तर आपण पुढच्या पिढीला ७/१२ तर देऊ पण शेती देऊ शकणार नाही.

कधीतरी दूरचित्रवाणी वर एक जाहिरात येत असे. त्यात मुलगा आपल्या वडिलांसोबत कार मधे बसलेला असतो. सिग्नलवर थांबलेल्या गाड्यापैकी एकही गाडी बंद नाही व तेल नाहक जळते आहे हे पाहून तो वडीलांना सांगतो की तो मोठा झाल्यावर "सायकल दुरुस्तीचे दुकान टाकेल कारण तेलतर संपुन जाईल मग सगळे सायकलच चलवतील" वडील आवक होतात व गाडी बंद करतात. आजच सगळे वैभव जगून-आजच सगळा कस काढून आपण मिळवणार तरी काय?

काळ्या मातीला आई म्हणणारे अपण - तिला पार म्हातारी करून चालणार नाही. तिला कसायाला नको पोसायला हवे. तिला नुसते वापरायला नको तिच्या - भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मांचे संवर्धन कराया हवे.

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद