फॉलोअर

व्हाटसएप ग्रुप

आवळा देवून कोहळा घेणाऱ्या पासून रहा सावध!


त्याकाळी माणूस शिकार करीत असे. कबिल्यात राहणारे सर्व पुरुष भाले घेवून जंगलात शिकार करायला जात. स्त्रिया मुले सांभाळीत व जंगली प्राण्यापासून कबिल्याचे रक्षण करीत. शिकार भेटेलच याची काही खात्री नव्हती. कधी कधी भेटली तर एक तर कुटुंबाला पुरत नसे. कधी कधी इतकी मोठी शिकार हाती येई कि एका कुटुंबाकडून खाल्ली जात नव्हती. शिल्लक राही. तेव्हा आता सारखे फ्रीज नव्हते. हरणासारखी शिकार मिळाली कि ती कबिल्यात वाटली जाई. त्यामुळे देवाणघेवाण नित्याची होती. यातूनच कबिला टिकून राही. त्याकाळी ती एक गरज होती.

काही वर्षापूर्वी आम्हाला एका कौटुंबिक जेवणाचे आग्रही आमंत्रण मिळाले.  या कुटुंबाशी आमची फक्त तोंड ओळखच होती. ते आमच्या बैठकीतली नसल्याने थोडे हीचकिचतच आम्ही निमंत्रण स्वीकारले. अंदाजानुसार हि सायंकाळ अतिशय कांटाळवाणी ठरली. पण इलाज नव्हता. देवाणघेवाण आली. आम्ही देखील त्यांना निमंत्रण दिले. पुन्हा एका कंटाळवाण्या सायंकाळचा मुहूर्त ठरला. हा क्रम असाच सुरु राहिला. अश्या कितीतरी सायंकाळी "अक्षरशः वाया गेल्या".

आता संदर्भ बदलले असले तरी लग्नात कपडे देवाण घेवाण सुरूच आहे. देवाणघेवाणीच्या कार्यक्रमातून आलेल्या कापडांनी आमचे एक कपाट भरून पडले आहे कारण आम्ही फक्त स्वत: निवडलेलेच कपडे घालतो. मंदबुद्धी नातेवाईक हे कधी लक्षात घेतील कोण जाणे.


नको असल्येल्या देवाण घेवाणीतून वेळ व पैसा कसा वाया जातो ते आपण बघितले पण पुढचा मुद्दा त्यापेक्षा महत्वाचा आहे.

आजकाल गल्ली बोळातील दुय्यम दर्जाचे नेते येता-जाता आपल्याला नमस्कार घालतात. या लोकांना धड बोलता येत नाही. कोणतेच सामाजिक प्रश्न समजून घ्यायची यांची बौद्धिक ताकद नसते. समजले तरी अडचणी सोडवण्याची धमक त्यांच्यात नसते. अगदी नित्याची साफसफाई करून घेणे, कचरा कुंड्या वेळेवर उचलवून घेणे त्यांना जमत नाही. कुठल्यातरी मोठ्या नेत्याच्या फेकलेल्या तुकड्यावर हे जगत असतात. पण मोठ्या नेत्याच्या मर्जीत राहण्यासाठी वार्डात ओळखपाळख ठेवणे त्यांच्यासाठी गरजेचे असते. मग ते गल्लीतील अधेड वयातील मुलामध्ये उठबस करतात. गणपती व दुर्गोत्सव असे कार्यक्रम घेतात. वर्गणी गोळा करतात व उरलेल्या पैशात या मुलांची खायची-प्यायची हौस भागवतात. त्यांचा येत-जाता नमस्कार हा फक्त या वर्गणी पुरता असतो. जर तुम्ही विनाकारण त्यांना तूल दिली तर तुमची ५००० रु ची पावती ते हक्काने फाडून घेतात. जर तुम्ही नमस्कार-चमत्कार नाही केला तर २५१/- च्या पावतीवर देखील भागते.

मार्केटिंग मध्येही देवाणघेवाणीच्या पद्धतीचा उपयोग करून नको त्या वस्तू माथी मारल्या जातात. नुकत्याच एका कृषीप्रदर्शनात गेलो. आत प्रवेश केल्यावर विविध कंपन्यांचे स्टोल लागलेले होते. एका कोपऱ्यात एक माणूस रंगीबेरंगी आकर्षक पिशव्या वाटत होता. घ्या हो, गिफ्ट आहे, पॅम्प्लेट ठेवायला कामी येईल. मी घेतली. त्यावर कंपनीचे नाव, उत्पादने छापली होती.  फिरत फिरत पुढे गेलो. तिथे एका दालनात गेल्यावर त्याच कंपनीचा स्टोल होता. माझ्या हातातली पिशवी पाहून त्या कंपनीच्या स्त्री प्रतिनिधीने अगदी हात धरून स्टोल मध्ये ओढले. आग्रह करून करून उत्पादनांची माहिती दिली. माझे नाव, फोननंबर लिहून घेतले. कोणते पिक लावले आहे? हों का? या पिकासाठी आमचे खास उत्पादन आहे. प्रदर्शनात खास सूट आहे. घ्याच! वास्तविक पाहता शेतीत वापरायच्या वस्तू म्हणजे काही "साडी-चोळी" नाही. पण पिशवी घेवून मी चूक केली होती. आता तोंडघशी पडण्याशिवाय पर्याय नव्हता. साडेपाच हजाराचा चुना लागला. आवळा देवून कोहळा घेतला हरामखोरांनी!

टिप्पण्या

एग्रोडॅड चा सल्ला!



शेतीच्या माध्यमातून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी पाटील बायोटेक तंत्राचा करा अवलंब. हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी...


आतापर्यंतच्या वाचकांची संख्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गंधक वापरून कमी खर्चात वाढवा उत्पादकता

"मजुरांची" समस्या - नियोजन

मिरचीतील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

planters

हा फॉर्म भरायला विसरू नका

आपण कोण आहात?

एग्रोडॅड तुमचा मदतनीस आहे. तुम्ही कोण आहात हे जाणून घेतल्या शिवाय आम्ही तुमची मदत करू शकत नाही, तेव्हा हा फॉर्म नक्की भरा व आमची मदत करा. आपली माहिती इतर कुणासोबत शेअर केली जाणार नाही व मार्केटिंग साठी देखील वापरली जाणार नाही. 



धन्यवाद